आपल्या सर्वांच्या हृदयात वसणारे, मनात रुजलेले गीत रामायण आज पुन: पुन्हा आठवते आहे!
शब्दप्रभू ग.दि.माडगुळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके ह्यांच्या मनातील रामभक्ती, जनशक्ती बनून अवतरली आणि अनेक शतके तशीच मराठी जनांच्या ओठांवर पण राहील ह्यात तिळमात्र शंका नाही. त्याच गीत रामायणातील शब्दांचा आधार घेऊन आज म्हणावेसे वाटत आहे,
त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जय जय कार
भरत भूवरी आज उतरले स्वर्ग सौख्य साकार ||
तव दृष्टीच्या पावन स्पर्शे
आज मांडला उत्सव हर्षे
मने विसरली पाचशे वर्षे
सुसज्ज आहेत तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार
त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार।।१।।
प्रजा जनीं जे रचिले स्वप्नी
मूर्त दिसे ते स्वप्न लोचनी
जयघोष उमटे मनामनातूनी
स्वस्थळीच होणार उन्नत सुंदर, मंदिर पुन्हा साकार
त्रिवार जयजयकार रामा त्रिवार जयजयकार ।।२।।

No comments:
Post a Comment